SwarBhaskar VishawaRatna Pandit Bhimsen Joshi.
( 4th Feb 1922 - 24th Jan 2011 )
India's greatest singer lays down his tanpura.
Any such claim will be debated and contested, of course, but not many would dispute that he was the most influential classical musician of the era.
Panditji was influential because at least two generations of musicians wanted to be like him, and many innocently mimicked his style. He had grace and charisma in person and on stage.
संथ स्वरविलासातील विविधता, अतिचपळ दाणेदार ताना, बंदिशीतील बोलांचा वापर, सरगमचा समावेश, मांडणीमध्ये नम्र भावाबरोबरच अधेमधे जोशपूर्ण आवेश आणि हे सर्व करीत असता गरज भासेल तिथे लयीशी सलगी असे किराण्याच्या अतिशय भावनाप्रधान व्यक्तित्वाला शोभून दिसणारे नवे नवे अलंकार घालून ही गायकी श्रोत्यांशी संवाद साधते आहे. त्यांना अविनाशी आनंदात भिजवून टाकते आहे. भीमसेनजींच्या गाण्यात हे बदल प्रकर्षाने जाणवत.
' तंबोऱ्याच्या तुटल्या तारा,
अभंगवाणी गोठून गेली,
शहनाईची गुंज अचानक,
अश्रूंमध्ये भिजून गेली,
भारत-भूचे रत्न हरवले,
पुण्यनगरी कुंठीत झाली...'
पंडित भीमसेन जोशी हे भारतीय शास्त्रीय संगीताचे कोहिनूरच होते. शास्त्रीय संगीत एका विशिष्ट वर्गापुरतेच मर्यादीत होते. मात्र पंडितजींनी या मर्यादा ओलांडून संगीताला सामान्य माणसाच्या जवळ नेले. जाणकार तसेच सर्वसामान्य दोघांनीही त्यांच्या संगीताला भरभरून दाद दिली, हेच त्यांचे सर्वात मोठे योगदान होते.
भीमसेनजींच्या गाण्याचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा झपाटलेपणा. गाणं कुठेही आणि कधीही असो, ते अगदी झपाटल्यासारखं गायचे. मुख्य म्हणजे हे झपाटलेपण मैफलीच्या शेवटापर्यंत कायम असायचं. त्यामुळे एकदा त्यांच्या मैफलीला बसलेला रसिक शेवटपर्यंत तिथेच खिळून राहायचा. तो भीमसेनजींच्या झपाटलेपणातून सुटूच शकायचा नाही.
भीमसेनजींसारखाच 'भीमसेनी' लोकप्रियता मिळवणारा शास्त्रीय-संगीत गायक एखादाच.
im a sikh and i still luv dis vid
pandejibrar 1 year ago
@pandejibrar No Matter who u r? U R Music Lover.Music has no cast & religion.
Uday2310 1 month ago
' तंबोऱ्याच्या तुटल्या तारा,
अभंगवाणी गोठून गेली,
शहनाईची गुंज अचानक,
अश्रूंमध्ये भिजून गेली,
भारत-भूचे रत्न हरवले,
पुण्यनगरी कुंठीत झाली...'
पंडित भीमसेन जोशी हे भारतीय शास्त्रीय संगीताचे कोहिनूरच होते. शास्त्रीय संगीत एका विशिष्ट वर्गापुरतेच मर्यादीत होते. मात्र पंडितजींनी या मर्यादा ओलांडून संगीताला सामान्य माणसाच्या जवळ नेले. जाणकार तसेच सर्वसामान्य दोघांनीही त्यांच्या संगीताला भरभरून दाद दिली, हेच त्यांचे सर्वात मोठे योगदान होते.
Uday2310 1 year ago