जेव्हा संपूर्ण लढाया बंद झाल्या तेव्हा हि कुटुंबे खाली उतरली. काही कुटुंबे पश्निमेकडे तर काही पूर्वेकडे राहायला गेली. त्यांच्यापैकीच ५ कुटुंबांनी एकत्र येऊन गांगणगावचा वाघया बसविला. त्यांनी हा वाघया बसविताना ५ रुपयांचे चांदीचे नाणे टाकले आहे. हे ५ रुपयांचे नाणे म्हणजे ५ पंचांनी एकत्र येऊन वाघया बसविला आहे असे मानले जाते. अशा त-हेने काही कुटुंबे कुटुंबे येथे म्हणजे गांगणगावला वस्ती करून राहिली. तेथेच त्यांनी आपले गावाचे ठिकाण वसवले. काही कुटुंबे आसवाली तर काही करंजगाव अशा वेगवेगळया गावी गेली.
याचा अर्थ एवदाच कि त्या खंडातून इतिहास सांगतात. बारडाचा इतिहास हा कि बोरीची जी माल आहे आणि मेढाचा दंडा आहे तिथे इतिहास काळात माणसाची वस्ती होती असे म्हणतात. जेव्हा १६६४ मध्ये शिवाजी राजांनी सुरतेवर छापा घातला होतं तेव्हा आपली लोकं उदा. गावातील मेढाची कुटुंबे या बारडाच्या डोंगरावर बोरीची माळ येथे वस्ती करून राहत होती. शत्रूपासून रक्षण व्हावे म्हणून हे लोकं तेथे वस्ती करून राहिले.
बारड डोंगराच्या पायथ्याशी गांगणगाव वसलेले आहे. बारडाचे वैशिष्ठ्य आहे की , त्याचा उल्लेख महादेव-गंगा गौरीच्या काळातील पुरातन कथा आणि काव्यात आढळतो. आणि वारली लोक एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर जे दिवस करतात. त्यात गिरणाचा, नारणाचा आणि धरतीचा असे तीन खंड गायले जातात. या गिरणाचा आणि नारणाचा खंड गाताना ते असे ते बारडाच्या दांडावरून नेतात. ते पूर्वेकडून म्हणजेच जव्हार डोंगर वगेरे येथून पुढे मेडीला नेतात. म्हणजेच पूर्वेकडून पश्चिमेकडे ते खंड गात बारडावरून पुढे अरबी समुद्राला सोडून देतात.
जेव्हा तुघलकने वसईवर स्वारी केली त्यावेळेस इथूनच गेला असे म्हणतात, तेच हे उफरट लोक. अपराजित नावाचा एक त्या काळात राजा होता. कदाचित या अपराजित राजाच्या नावाचा लोकांनी उफरट असा अपभ्रंश झाला असेल. तर बारडाच्या डोंगराजावळून सैन्याचा जाण्याचा मार्ग होता, तसेच खंडीत आढळणारे दगड हे लष्करानेच टाकले आहेत असे म्हणतात. तसेच गांगणगावातील जे वाघयाचे स्थान आहे त्याच्या पूर्वेला एक विहीर आहे, त्यात या लष्कराने आपली शस्त्रे म्हणजेच त्यांच्या तलवारी आणि ढाली टाकल्या आहेत असे म्हणतात.
ते म्हणतात, आदिवासी लोकांना माहिती आहे की, त्या परिसरात उफरट नावाची लोकं आली होती. या उफरट नावाच्या लोकांनी या बारीच्या खंडीतून प्रवास केलेला आहे. उफरट म्हणजे नेमके काय तर मुघल आणि मुसलमान लोक. तसेच मराठा म्हणजे चिमाजी अप्पा यांनी जेव्हा वसईवर स्वारी केली त्यावेळेस मुसलमान म्हणजेच मुघल लोकांनी जाण्यासाठी हा मार्ग वापरण्यात आला होता. तर असा हा गांगणगाव, आंबेसरी, पुढे वाणगाव आणि पोलीपोसरी कडून वसईला जाण्याचा मार्ग होता.
डहाणू मधल्या अनेक डोंगरापैकी एक म्हणजे बारडाचा डोंगर. नुकतीच आयुषतर्फे तेथे छोटीशी सहल काढण्यात आली. तेथे एक श्री. संपत ठाणकर नावाचे सदगृहस्थ भेटले. आदिवासी परंपरा आणि वारली कला अभ्यासक तसेच लेखक असलेले संपत ठाणकर यांनी बारडाच्या डोंगराविषयी महत्त्वाची माहिती सांगितली.
बारडाच्या डोंगरावर जे दगडी बांधकाम आहे ते बौद्धकालीन शिल्प आहे असेही काहींचे म्हणणे आहे. तर काही जन त्याला देवाचे घर मानतात.
adiyuva 9 months ago
जेव्हा संपूर्ण लढाया बंद झाल्या तेव्हा हि कुटुंबे खाली उतरली. काही कुटुंबे पश्निमेकडे तर काही पूर्वेकडे राहायला गेली. त्यांच्यापैकीच ५ कुटुंबांनी एकत्र येऊन गांगणगावचा वाघया बसविला. त्यांनी हा वाघया बसविताना ५ रुपयांचे चांदीचे नाणे टाकले आहे. हे ५ रुपयांचे नाणे म्हणजे ५ पंचांनी एकत्र येऊन वाघया बसविला आहे असे मानले जाते. अशा त-हेने काही कुटुंबे कुटुंबे येथे म्हणजे गांगणगावला वस्ती करून राहिली. तेथेच त्यांनी आपले गावाचे ठिकाण वसवले. काही कुटुंबे आसवाली तर काही करंजगाव अशा वेगवेगळया गावी गेली.
adiyuva 9 months ago
याचा अर्थ एवदाच कि त्या खंडातून इतिहास सांगतात. बारडाचा इतिहास हा कि बोरीची जी माल आहे आणि मेढाचा दंडा आहे तिथे इतिहास काळात माणसाची वस्ती होती असे म्हणतात. जेव्हा १६६४ मध्ये शिवाजी राजांनी सुरतेवर छापा घातला होतं तेव्हा आपली लोकं उदा. गावातील मेढाची कुटुंबे या बारडाच्या डोंगरावर बोरीची माळ येथे वस्ती करून राहत होती. शत्रूपासून रक्षण व्हावे म्हणून हे लोकं तेथे वस्ती करून राहिले.
adiyuva 9 months ago
बारड डोंगराच्या पायथ्याशी गांगणगाव वसलेले आहे. बारडाचे वैशिष्ठ्य आहे की , त्याचा उल्लेख महादेव-गंगा गौरीच्या काळातील पुरातन कथा आणि काव्यात आढळतो. आणि वारली लोक एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर जे दिवस करतात. त्यात गिरणाचा, नारणाचा आणि धरतीचा असे तीन खंड गायले जातात. या गिरणाचा आणि नारणाचा खंड गाताना ते असे ते बारडाच्या दांडावरून नेतात. ते पूर्वेकडून म्हणजेच जव्हार डोंगर वगेरे येथून पुढे मेडीला नेतात. म्हणजेच पूर्वेकडून पश्चिमेकडे ते खंड गात बारडावरून पुढे अरबी समुद्राला सोडून देतात.
adiyuva 9 months ago
जेव्हा तुघलकने वसईवर स्वारी केली त्यावेळेस इथूनच गेला असे म्हणतात, तेच हे उफरट लोक. अपराजित नावाचा एक त्या काळात राजा होता. कदाचित या अपराजित राजाच्या नावाचा लोकांनी उफरट असा अपभ्रंश झाला असेल. तर बारडाच्या डोंगराजावळून सैन्याचा जाण्याचा मार्ग होता, तसेच खंडीत आढळणारे दगड हे लष्करानेच टाकले आहेत असे म्हणतात. तसेच गांगणगावातील जे वाघयाचे स्थान आहे त्याच्या पूर्वेला एक विहीर आहे, त्यात या लष्कराने आपली शस्त्रे म्हणजेच त्यांच्या तलवारी आणि ढाली टाकल्या आहेत असे म्हणतात.
adiyuva 9 months ago
ते म्हणतात, आदिवासी लोकांना माहिती आहे की, त्या परिसरात उफरट नावाची लोकं आली होती. या उफरट नावाच्या लोकांनी या बारीच्या खंडीतून प्रवास केलेला आहे. उफरट म्हणजे नेमके काय तर मुघल आणि मुसलमान लोक. तसेच मराठा म्हणजे चिमाजी अप्पा यांनी जेव्हा वसईवर स्वारी केली त्यावेळेस मुसलमान म्हणजेच मुघल लोकांनी जाण्यासाठी हा मार्ग वापरण्यात आला होता. तर असा हा गांगणगाव, आंबेसरी, पुढे वाणगाव आणि पोलीपोसरी कडून वसईला जाण्याचा मार्ग होता.
adiyuva 9 months ago
बारडाचा डोंगर
डहाणू मधल्या अनेक डोंगरापैकी एक म्हणजे बारडाचा डोंगर. नुकतीच आयुषतर्फे तेथे छोटीशी सहल काढण्यात आली. तेथे एक श्री. संपत ठाणकर नावाचे सदगृहस्थ भेटले. आदिवासी परंपरा आणि वारली कला अभ्यासक तसेच लेखक असलेले संपत ठाणकर यांनी बारडाच्या डोंगराविषयी महत्त्वाची माहिती सांगितली.
adiyuva 9 months ago